एआय आणि उद्योग सुधारणांवर अर्थसंकल्पाचा भर

News Service

नवी दिल्ली : अर्थसंकल्प २०२६ हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या उपभोगातून एआय-सक्षम नवोन्मेषाकडे होत असलेल्या परिवर्तनाचे प्रतीक असल्याचे मत सेल्सफोर्स साऊथ एशिया विभागाच्या प्रेसिडेंट आणि सीईओ अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. हा अर्थसंकल्प केवळ आकारावर आधारित नव्हे, तर बुद्धिमत्तेवर आधारित सात ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा आराखडा असल्याचे त्यांनी नमूद केले.

अरुंधती भट्टाचार्य पुढे म्हणाल्या की, या धोरणाची रचना संतुलित तसेच दीर्घकालीन दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. सन २०४७ पर्यंत क्लाउड सेवांसाठी देण्यात आलेली करसवलत डेटा सार्वभौमत्वाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे २०३० पर्यंत सुमारे ५० अब्ज डॉलर्सची डेटा सेंटर गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता असून, भारत उदयोन्मुख बाजारांसाठी क्लाउड हब म्हणून पुढे येऊ शकतो.

तसेच या अर्थसंकल्पातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीच्या सुधारणांमधून प्रगल्भ विचारसरणी स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. १० हजार कोटी रुपयांचा एसएमई ग्रोथ फंड, टीआरईडीएस  प्लॅटफॉर्मचा अनिवार्य वापर, तसेच ‘सेफ हार्बर’ मर्यादांचा विस्तार या एकत्रित उपाययोजनांमुळे देशातील ६.३ कोटी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग घटकांना केवळ अस्तित्व टिकविण्यापुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर स्पर्धक म्हणून पुढे जाण्याची क्षमता प्राप्त होईल, असे त्यांनी नमूद केले.

शिवाय, अर्थसंकल्प २०२६ मध्ये एआयचे एकत्रीकरण वास्तववादी दृष्टिकोनातून करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारत-विस्तारित बहुभाषिक कृषी प्लॅटफॉर्म तसेच शालेय अभ्यासक्रमात एआयचा समावेश ही पिढीजाणिवेची दूरदृष्टी दर्शविते. यामुळे लोकसंख्यात्मक लाभाचे रूपांतर ‘बुद्धिमान लाभांशा’त होईल, असे मत अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button