भारत, २५ ऑगस्ट २०२५: कोका-कोलाने आपल्या बॉटलिंग भागीदारांसह, देशातील सर्वात मोठ्या ट्रक फ्लीट्सपैकी एकाचा विस्तार करून ग्रीन लॉजिस्टिक्सची नव्याने व्याख्या केली आहे. त्यात देशभरात ५,००० हून अधिक ईव्हींचा समावेश आहे. ही धोरणात्मक गुंतवणूक केवळ भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फ्रेशनेस देत नाही तर रोजगार निर्मितीला चालना देते आणि ऑपरेशनल उत्कृष्टता आणि सामाजिक परिणामाप्रति वचनबद्धता अधोरेखित करते.

राष्ट्रीय स्तरावरील फ्लीट विस्तारामुळे वाढ आणि संधींना चालना
कोका-कोलाची उत्पादने दररोज शेकडो किलोमीटर प्रवास करून शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये कार्यक्षमतेने पोहोचतात. हे विशाल वितरण नेटवर्क हजारो ट्रक चालकांच्या समर्पित कार्यबलावर अवलंबून आहे. त्यांची देशभरात पेय पदार्थांची वेळेवर वितरण करण्यातील भूमिका महत्त्वाची आहे. लॉजिस्टिक्स फ्लीटचा सतत विस्तार थेट स्थिर रोजगार संधी निर्माण करतो. त्यामुळे भारताच्या पुरवठा साखळी कार्यबलात महत्त्वपूर्ण योगदान देणारा म्हणून कोका-कोलाचे स्थान बळकट होते.
बॉटलिंग पार्टनर्समुळे नावीन्यपूर्णता आणि प्रभावाला चालना
कोका-कोला बॉटलर्समधील एक प्रमुख कंपनी असलेल्या सुपीरियर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेडने यंदा सुमारे २०० अत्याधुनिक ट्रक आणि ईव्हीज जोडून त्यांच्या ताफ्यात वाढ केली आहे. यामुळे प्लांटपासून शेल्फपर्यंत वितरण क्षमता आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, सिस्टममधील आणखी एक प्रमुख बॉटलिंग पार्टनर असलेल्या एसएलएमजी बेव्हरेजेसने मागील तीन वर्षांत त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात ३००० हून अधिक ईव्हीज आणल्या आहेत आणि शेवटच्या मैलापर्यंत डिलिव्हरी करणे शक्य केले आहे. हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी)ने १० राज्यांमध्ये अंदाजे ५०० ईव्हीज तैनात करून नेटवर्क मजबूत केले आहे. त्यामुळे प्रादेशिक व्याप्ती आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारली आहे. बॉटलिंग पार्टनर्सच्या ताफ्यांचे प्रमाण येत्या वर्षांत वाढण्याची अपेक्षा आहे.
चालकांचे कल्याण आणि रस्ता सुरक्षेला चालना
कामगारांच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच कोका-कोला एका व्यापक कार्यक्रमाद्वारे चालक कल्याणावर भर देते. त्यात भारतातील विविध रस्त्यांच्या परिस्थितीनुसार तयार केलेले वार्षिक रस्ते सुरक्षा प्रशिक्षण, नियमित वैद्यकीय आणि दृष्टी तपासणी आणि रस्ते सुरक्षा व ताण व्यवस्थापनावर केंद्रित वेलनेस सेमिनार यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक वाहनाचे ऑपरेशनल मानक पूर्ण करण्यासाठी नियमितपणे मूल्यांकन केले जाते. या उपक्रमांचे उद्दिष्ट चालकांची सुरक्षा आणि आरोग्य सुधारणे, कार्यान्वयनातील जोखीम कमी करणे आणि कामातील एकूणच समाधान सुधारणे आहे.
कोका-कोला इंडियाचे उपाध्यक्ष संदीप बाजोरिया म्हणाले, “भारताचे लॉजिस्टिक्स लँडस्केप विकसित होत आहे आणि आम्हीही त्यासोबत जबाबदारीने विकसित होत आहोत. आमची ट्रकिंग इकोसिस्टम आर्थिक संधी आणि परिणाम-नेतृत्वाच्या प्रगतीचे एक इंजिन आहे. ते राज्यांमध्ये उपजीविकेच्या संधी निर्माण करते, वाहतूक केंद्रांमध्ये सूक्ष्म-अर्थव्यवस्थांना चालना देते आणि आमची पेये महानगरांपासून खेड्यापाड्यातील किराणा दुकानांपर्यंत प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचतील याची खात्री करते. आम्ही आमच्या क्षमतांचा विस्तार करत असताना या नेटवर्कला सक्षम करणाऱ्या लोकांना सुरक्षितता, कौशल्य-निर्मिती आणि पाठबळ देण्यावर तितकेच लक्ष केंद्रित करतो.”
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विनय नायर म्हणाले, “एचसीसीबीमध्ये आम्ही भारतातील शीतपेय क्षेत्राच्या गतिमान मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत विकसित होत आहोत. संख्येत वाढ केल्याने आमच्या शेवटच्या टप्प्यातील डिलिव्हरी तर मजबूत होतातच पण त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देताना आमच्या किरकोळ विक्रेत्यांना जलद आणि चांगल्या प्रकारे सेवा देणाऱ्या चपळ, तंत्रज्ञान-सक्षम पुरवठा साखळी उपायांबद्दलची आमची वचनबद्धता देखील बळकट होते.”
सुपीरियर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सेठी म्हणाले, “आमचे लक्ष नेहमीच कार्यान्वयन अचूकता आणि बाजारपेठेतील सुसज्जतेवर राहिले आहे. या विस्तारासह आम्ही एक डिलिव्हरी पॉवरहाऊस तयार करत आहोत, जे अद्वितीय वेग, व्याप्ती आणि विश्वासार्हता देते. जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या पुरवठा साखळ्यांपैकी एकाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही अंमलबजावणीत नवीन मानके स्थापित करत आहोत.”
एसएलएमजीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार म्हणाले, “आमच्या ईव्ही फ्लीटचा विस्तार करणे हे कोका-कोला सिस्टमच्या वाढीच्या उद्दिष्टांशी सुसंगत डिलिव्हरी वेग आणि क्षमता सुधारण्यासाठी एक जाणीवपूर्वक उचललेले पाऊल आहे. ही गुंतवणूक सुधारित खर्च आणि सेवा देऊन, विशेषतः ग्रामीण बाजारपेठांमध्ये वाढत्या ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्याची आमची क्षमता मजबूत करते.”
कोका-कोलाची उत्पादने देशभर प्रवास करत असताना प्रत्येक किलोमीटर केवळ ग्राहकांसाठी ताजेतवानेपणाच नाही तर असंख्य भारतीयांसाठी नवीन संधी, उपजीविका आणि वाढ देखील दर्शवते. वाढत्या चालक कार्यबलाला व्यापक कल्याणकारी समर्थनासह एकत्रित करून कंपनी भारतातील सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देते, अर्थपूर्ण रोजगार प्रदान करते आणि समाजकल्याणाला चालना देते.