मुंबई : भारत आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. येणारी दहा वर्षे ही स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करणाऱ्या तरुणांची असणार आहेत, जे देशाच्या आर्थिक भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) यांच्या माहितीनुसार, भारतातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. पहिले घर खरेदी करणे असो किंवा लवकर निवृत्ती घेण्याचे स्वप्न असो, या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन, शिस्तबद्ध आर्थिक योजना बनवणे आणि बचत करणे तरुणांसाठी खूप महत्वाचे आहे.
या पार्श्वभूमीवर, आयसीआयसीआयप्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस ही मार्केट-लिंक्ड जीवन विमा योजना आहे, जी कमावत्या तरुण वर्गाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. फक्त 1,000 रुपये प्रति महिन्यापासून प्रीमियम सुरू होत असल्याने ही योजना सर्वांसाठी परवडणारी आहे. त्यामुळे तरुण व्यावसायिक आणि पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे लोक लवकर गुंतवणूक सुरू करू शकतात, सातत्याने गुंतवणूक करू शकतात आणि भारताच्या वाढीचा लाभ घेऊ शकतात.
श्री. विकास गुप्ता, चीफ प्रॉडक्ट ऑफिसर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणाले, “आयसीआयसीआयप्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस ही एक परवडणारी योजना आहे. या योजनेत ग्राहकांनी भरलेला संपूर्ण प्रीमियम त्यांनी निवडलेल्या मालमत्ता वाटपानुसार गुंतवला जातो. या योजनेतून ग्राहकांना 25 वेगवेगळ्या फंडमधून आणि 4 पोर्टफोलिओ पर्यायांमधून निवड करता येते. तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेतून अंशतः पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच, या योजनेत ‘वेव्हर ऑफ प्रीमियम’ हा अतिरिक्त लाभ आहे, ज्यामुळे आयुष्यात काही अनपेक्षित घडले तरी कुटुंबाची आर्थिक उद्दिष्टे सुरक्षित राहतील याची खात्री देते.
युलिप प्लॅनची रचना अशी बनवलेली आहे की ती दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची सवय लावते आणि संपत्ती वाढवण्यास मदत करते. हे ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे कारण मॉर्गन स्टॅनलीच्या माहितीनुसार, 2028 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. युलिप योजना ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार गुंतवणूक पद्धत निवडण्याची आणि त्यात कोणतीही शुल्क किंवा कर न भरता वेगवेगळ्या फंडांमध्येबदल करण्याची सुविधा देखील देते.