टाटा मोटर्सच्‍या आरोग्‍य उपक्रमाने आरोग्‍यसेवा व पोषण यांद्वारे ६.६ लाखांहून अधिक व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला

News Service

कुपोषित मुलांमध्‍ये ८७ टक्‍के बरे होण्‍याचे प्रमाण संपादित केले आणि महिलांमध्‍ये अॅनेमियाचे प्रमाण ८० टक्‍के कमी केले

राष्‍ट्रीय, सप्‍टेंबर ४, २०२५: भारत राष्‍ट्रीय पोषण सप्‍ताहासाठी सज्ज असताना टाटा मोटर्स देखील आपल्‍या आरोग्‍य उपक्रमाच्‍या माध्‍यमातून देशभरातील समुदाय आरोग्‍यसेवा प्रगत करण्‍याच्‍या दिशेने भरीव प्रयत्‍न करत आहे. या उपक्रमाचा त्रिस्‍तरीय दृष्टिकोन आहे: मुलांमधील कुपोषणाचे निराकरण करणे, महिला व किशोरवयीनमध्‍ये आरोग्‍यबाबत जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्‍मक व उपचारात्‍मक आरोग्‍यसेवा देणे.

आर्थिक वर्ष २४-२५ मध्‍ये आरोग्‍य उपक्रम जवळपास ६.६६ लाख लाभार्थींपर्यंत पोहोचला, जोथे कुपोषित मुलांमध्‍ये ८७ टक्‍के बरे होण्‍याचे प्रमाण संपादित केले आणि महिलांमध्‍ये अॅनेमियाचे प्रमाण ८० टक्‍के कमी केले. या निष्‍पत्तींमधून लवकर आरोग्‍य व पोषण हस्‍तक्षेपांच्‍या क्षमतेला अवलंबण्‍याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता आणि समुदायांमधील त्‍यांचा दीर्घकालीन प्रभाव दिसून येतो.

जमशेदपूर, पुणे, पंतनगर, धारवाड, लखनऊ, सानंद आणि मुंबई येथील ग्रामीण समुदाय व शहरी झोपडपट्ट्यांसह आरोग्यसेवेच्या गरजा असलेल्या प्रदेशांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य उपक्रमाने पोषण, आरोग्य जागरूकता आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा सर्वात जास्त गरज असलेल्‍या व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचवून मोठ्या सुधारणा केल्या आहेत.

जमशेदपूरमध्ये, आरोग्य उपक्रमाने पूर्व सिंहभूम जिल्हा आणि आसपासच्‍या दुर्गम भागातील जवळपास ३ लाख समुदाय सदस्यांवर सकारात्मक परिणाम केला आहे. शहरी वंचित समुदायांना भेडसावणाऱ्या आव्हानांना ओळखून टाटा मोटर्सने मुंबईच्या उपनगरातील ट्रॉम्बे येथील झोपडपट्ट्यांमध्ये प्रकल्प आरोग्यसंपन्‍नद्वारे आपले प्रयत्‍न वाढवले, ज्यामुळे मुलांमधील गंभीर कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या ९० टक्‍क्‍यांनी कमी झाले. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या गतीला कायम ठेवत टाटा मोटर्सने सानंदमध्ये कुपोषणाचे निराकरण करणारा प्रकल्‍प सुरू केला, ज्यामुळे ५०६ गंभीर कुपोषित मुलांना योग्‍य केअर सेवा मिळाली आणि ८८ टक्‍के बरे होण्‍याचे प्रमाण संपादित झाले.  

आरोग्‍य उपक्रमाच्‍या प्रभावाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, ”टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही पोषणाकडे मानवी जीवनचक्रामधील स्थिरतेचा आधारस्‍तंभ आणि महत्त्वपूर्ण सक्षमकर्ता म्‍हणून पाहतो. आमच्‍या अरोग्‍य उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सर्वांगीण, समुदाय-संचालित मॉडेलसह मुलांमधील कुपोषण आणि मातांना भेडसावणाऱ्या आरोग्‍यसंबंधित समस्‍यांचे निराकरण करत आहोत, जेथे हे मॉडेल दीर्घकाळपर्यंत आरोग्‍य उत्तम राहण्‍याची खात्री देते. आमच्‍या धोरणात्‍मक सीएसआर आराखड्यामध्‍ये सामावलेला आणि सरकारी उपक्रम, सहयोगी व स्‍थानिक समुदायांसोबत सहयोगाने सक्षम करण्‍यात आलेल्या आरोग्‍य उपक्रमामधून मोठ्या प्रमाणात व शाश्वत आरोग्‍य निष्‍पत्तीप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला दिसण्‍यात आलेल्‍या सकारात्‍मक परिणामामधून आम्‍हाला पोषण व आरोग्‍य सारख्‍या राष्‍ट्रीय प्राधान्‍यक्रमांना प्रगत करत राहण्‍यास, तसेच आरोग्‍यदायी व अधिक समान भारत घडवण्‍यास प्रेरणा मिळाली आहे.”

२६ राज्‍ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये उपस्थितीसह टाटा मोटर्स शाश्वत विकास ध्‍येयांशी संलग्‍न राहून मुलांमधील कुपोषणाचे निराकरण करत, आरोग्‍याप्रती जागरूकतेला चालना देत आणि प्रतिबंधात्‍मक व उपचारात्‍मक केअर वाढवत समुदाय आरोग्‍यसेवा प्रगत करत आहे. आरोग्‍य उपक्रमामधून दिसून येते की लक्ष्यित, डेटा-संचालित हस्‍तक्षेप भारतातील पोषण क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडवून आणू शकतात, तसेच सिद्ध करत आहेत की उद्देश पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल केल्‍यास परिवर्तन निश्चित घडून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button